शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या या महत्वाच्या घोषणा
📝 राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर केला - यामध्ये कृषी क्षेत्रासाठी त्यांनी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत
पहा कशा आहेत घोषणा ?
🔰 भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार - तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल केले जातील
🔰 हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार - तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे
🔰 दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार , त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात येणार
🔰 कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्यात येईल
🔰 जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू करण्यात आली आहे
🔰 त्याचबरोबर भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे - शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्यात येईल
🔰 देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार
🔰 प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
🔰 या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
🔰 एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य
🔰 मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
👌 राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी - जाहीर झालेल्या घोषणा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाच्या आहेत - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments