👌 अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा
Govt. Update
⚠️ केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी काही आदेश जारी केले आहेत - नव्या आदेशानुसार यापुढे चारचाकी गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे केले आहे
🗣️ तसेच कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबत अनेक महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते आणखी बदल देखील करण्यात येतील - असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
💁♂️ आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ?
▪️ बऱ्याचदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स असतात.
▪️ मात्र जेव्हा याच गाड्यांचे उत्पादन देशात विक्रीसाठी केले जाते तेव्हा या गाड्यांमध्ये फक्त चारच एअरबॅग असतात. यामध्ये कार उत्पादक कंपन्यांची याबाबत विचारणा केली असता -
▪️ ते तेव्हा खर्च वाढत असल्याचे कारण सांगितात. पण मला वाटते की कंपन्यांचा हा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो.
▪️ त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
▪️ त्यामुळे यापुढे कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक गाड्यात सहा एअरबॅग्स बसवाव्या लागणार आहेत.
✒️ दरम्यान केंद्र सरकारने - घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments